04/02/2024
8-15 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे..माझा वर्गमित्र राजू खिल्लारे याचा अचानक फोन आला की प्रा.शहापूरकर सर जालन्यात आलेले आहे,तुझ्या घरा मागेच कार्यक्रमाचे ठिकाण आहे.मग त्याने सराना फोन दिला,मी म्हटले सर तुम्हाला यावं लागत आमच्या घरी.. सरांनी विनंतीला मान देऊन खिल्लारे सोबत आले..इतकं छान वाटलं ..नंतर हळू हळू गप्पा रंगत गेल्या..मग जे जे जालन्यात नोकरीनिमित्त स्थाईक झालेले आहेत तेही वर्ग मंडली आले..मग मस्त जुन्या आठवणीत सगळे रंगले... सरांना मी म्हटलं देखील सर आपला इथेच स्मृती संगम झाला..आपल्या महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षकाची आणि शहापूरकर सरांची खासियत म्हणजे प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थी बदल नाव गाव,काम सर्व आठवणीत आहे..नंतर पुन्हा भेटू ह्या अश्र्वासनानंतर सर्व निघून गेले.मग पुढे सर सोबत राहिलेल्या मित्रांच्या घरी गेलेत..त्याच वर्णन सरांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर केलेले आहे..
लिहिण्याच कारण इतकाच की सर आणि बाकीचे माझे वर्ग मित्र ,अजून 1 2 जन अनोळखी होते ,मात्र कुणालाच भेटून अस वाटल नाही की आम्ही खूप दिवसांनी भेटतोय,खूप कालावधी गेलाय..माझ्या कामानिमित्त मी 2-3 वेळेस शहापूरकर सर आणि गावित सर यांना भेटले मात्र तेही 8-9 वर्षाच्या कालावधीनंतर..मात्र मला सर आणि मित्राशी बोलताना मुळीच जाणवलं नाही की आपण काळाच्या खूप पुढे निघून आलो..आपण पुन्हा त्याच कॉलेजच्या आठवणीत जातो.आणि आपल्या कॉलेज ची खासियत आहे,आपल्या इथे शिक्षक विद्यार्थ्यांचे नाते प्रोफेशनल जरी असले तरी मैत्री पूर्व आहे, प्रत्येक शिक्षकाची आपापली वैशिष्ट आहेत,त्यांची आपल्यावर छाप आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलताना
पुन्हा आपण विद्यार्थी च्या भूमिकेत जातो..आणि जे कॉलेजच्या शिक्षक आणि classmates सोबत जे bonding आहे तस कुणासोबत नसतं..कारण विद्यार्थी दशेत. शिक्षक आणि मित्रांनी आपल स्ट्रगल बघितलेले असते,आता इतक्या दिवसांनी आपण आपल्या जीवनात स्थिरावलो हे बघून आपल्या घरच्यांना जितकं छान वाटत तितकाच कौतुक ह्या लोकांनाही असतं..मात्र ही शाबाशीची थाप वेगळी असते
सांग न्याच तात्पर्य हेच की आज इतक्या वर्षानी आपण भेटणार आहोत आपल्या कॉलेजने पुन्हा आपल्याला संधी दिली आहे की पुन्हा ते दिवस जगायचे आणि त्या आठवणी ताज्या करायच्या भलेही काहीच्या आठवणी कटू असतील,खोल जखमी असतील,,मात्र काळानुरूप सर्व आठवणी भरतात...तसेच स्मृती संगम हा त्या जखमेवरचा फुंकर आहे असं समजयच..
आज माणसाचं आयुष्य इतकं धावपळीचं झालंय,प्रत्येकाला कुठेतरी विश्रांती साठी थांबावं लागतंय,पुढे जोमाने काम करण्यासाठी..
त्याचप्रकारे "स्मृती संगम" हा स्फूर्ती संगम आहे जो प्रत्येकाला नवीन ऊर्जा देईल,
स्मृती संगम च्य निमित्ताने विचाराची आदान- प्रदान करू..पुन्हा जुन्या दिवसात रमुया...
टीप:स्वतःच्या अनुभवातून जे सुचलं ते लिहिलं,काही चुकलं असेल तर क्षमस्व🙏
- अस्मिता शिरवाडकर