22/07/2026
*विकसित भारत @ 2047 च्या संकल्पनेसह NSS कुलगुरू प्रेरणा शिबिरात विद्यार्थ्यांचा सहभाग*
*कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव* येथे दिनांक 10 ते 16, जुलै दरम्यान आयोजित *राष्ट्रीय सेवा योजना - कुलगुरू प्रेरणा शिबिर 2026* *विकसित भारत @ 2047* या संकल्पनेसह विद्यापीठ स्तरीय शिबिर संपन्न झाले.
या शिबिरात विविध मान्यवर, मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले, ज्यामध्ये विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी,अधिसभा सदस्य, विविध विभागांचे विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. डॉ. प्रवीण महाले सर- NSS संचालक व त्यांच्या विभागातील सहकाऱ्यांनी हे शिबिर यशस्वी केले.
या विद्यापीठ स्तरीय शिबिरात आपल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या BSc द्वितीय वर्षातील सुयश हरिचंद्र पाटील रा. पारंबी व विशाल मोहन पाटील रा. वडोदा या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सात दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले.
या शिबिरात विद्यार्थ्यांना श्रमदान, जल व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, सीड बॉल, उद्योजकता मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.