10/03/2017
🌞🚩
■ *पेप्सी-कोक, होळी आणि मेणबत्ती गँगची पाणी बचाव मोहीम* ■
●एक लिटर पेप्सी / कोक साठी कंपन्यांना एकूण ४ लिटर पाणी खर्च करावे लागते.
●एकट्या पेप्सिको कंपनीच्याच देशात ५८ पेक्षा जास्त फॅक्टरी आहेत. प्रत्येक फॅक्टरीत जमिनीतून पाणी काढणारे पंप आहेत.
●प्रत्येक पंप जवळपास जमिनीत ११५ ते १४० मीटर इतका खोल असतो व सतत पाण्याचा उपसा करत असतो. प्रत्येक फॅक्टरीत कमीत कमी असे दोन पंप असतात.
●एक कंपनी वर्षाला कमीत कमी जवळपास एक लाख क्युबिक मीटर पेक्षा जास्त पाण्याचा उपसा करते. (आपल्या कडे साॅफ्ट ड्रिंक बनवणाऱ्या किती कंपन्या आहेत ते मोजा व हिशोब करा)
●पावसाळ्यात तर प्रत्येक कंपनी दर महिन्याला जवळपास १२००० क्युबिक मीटर पेक्षा जास्त पाण्याचा उपसा करते.
●आता तर वर्षाला २,५०,००० क्युबिक मीटर पाणी उपसा करण्याच्या फॅक्टरीचा प्रस्ताव आहे.
●पाण्याच्या या उपस्यामुळे आजूबाजूची खेडी, तलाव, विहिरी, नद्या, जलसाठे नष्ट होतात. परिणाम एक कळशी पाण्यासाठी मैलोमैल चालत जाऊन पाणी भरणे, टँकर साठी तासनतास वाट पाहणे, पाणी कपात, दुष्काळ पडणे, शेती नष्ट होणे, जमीन नापीक होणे, याचा शेवट शेतकऱ्यांच्या आत्महत्या.
तुम्हाला खरोखरच पाणी वाचवायचे असेल तर पेप्सी / कोक पिणे सर्वप्रथम बंद करा. या कंपन्या येथे काही तुमची तहान भागवण्याची "सेवा" करायला आलेल्या नाहीत तर या कंपन्या येथे पैसे कमवायला आल्या आहेत. येथुन पैसे घेऊन जातात व बदल्यात दुष्काळ देऊन जातात. या पेप्सी / कोक सारख्या कंपन्या आपल्या देशातून इतका पैसा कमावतात पण त्यांनी साधा एक "धर्मार्थ दवाखाना" तरी बांधलाय का हो?चला, येथे आपण पैसा किंवा दवाखाना हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू या. पण या कंपन्या जे पेय आपल्याला विकतात ते आरोग्यास तरी लाभदायक आहे का?
आता हेच पहा पेप्सी / कोक मध्ये आरोग्यवर्धक असे काही आहे का? पेप्सी / कोक मध्ये असतं काय तर.... जवळपास २१ प्रकारचे विषारी पदार्थ?
▪सोडियम मोनो ग्लूटामेंट - वैज्ञानिकांच्या मतानुसार याने कॅन्सर होतो.
▪पोटॅशियम साॅरबेट, ब्राॅमिनेटेड वेजिटेबल ऑइल (BVO) - यांच्या मुळेही कॅन्सरच होतो.
▪मिथाइल बेन्जीन - याच्यामुळे किडनी खराब होते.
▪सोडियम बेन्जाॅईट - याच्यामुळे मुत्रनलिका व लिवरचा कॅन्सर होतो.
▪एंडोसल्फान - हे तर उत्तम कीटकनाशक आहे.
आता तुम्हीच ठरावा कि ही असली पेये आरोग्यासाठी आरोग्यवर्धक आहेत कि हानीकारक आहेत? व हे पेय बनवणाऱ्या कंपन्या देशाच्या वातावरणाला, पर्यावरणाला हितकारक आहेत कि हानिकारक आहेत? तेव्हा खरोखरच जर पाणी वाचवण्याची कळकळ असेल आणि आरोग्य तसेच पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर सर्वप्रथम ही पेये पिण्याचे बंद करा. मागणी घटली कि या कंपन्या हळू हळू बंद ही होऊ शकतात. एकदा का या कंपन्या बंद पडल्या कि आपण खऱ्या अर्थाने "पाणी वाचवलंय" असे म्हणू शकतो.
पाणी वाचवायचेच असेल तर आपल्या दैनंदिन सवयी सुधारायाला हव्यात. एका दिवसाच्या आणि ते ही हिंदूंच्याच सणांना "पाणी वाचवा" मोहीम राबवून काय साध्य होणार? आधी पेप्सी / कोक पिणे बंद करा व मगच होळीत होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययावर टीका करा. अन्यथा आम्हा हिंदूना हिंदूंचे सण आमच्या पद्धतीने साजरे करू द्या.
पाणी वाचवायचे असेल तर दैनंदिन सवयी स्वतः बदला, पारंपरिक सण साजरे करणे सोडू नका..
|| होळीच्या शुभेच्छा ||