11/11/2018
जवाहरलाल नेहरू हे बंदराविषयी थोडिशी माहिती
जवाहरलाल नेहरू हे बंदर १९८९ मध्ये स्थापन झाले. जगातील १०० कंटेनर बंदरापैकी ते एक आहे. सध्या या बंदराच्या कंटेनर मालवाहतूक क्षमतेत वाढ करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प बंदर प्रशासनानं योजिला आहे. नवीन ४१४ हेक्टरच्या लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून अत्याधुनिक पायाभूत सुविधा येथे विकासित केल्या जात असून, ज्यामुळे विस्तारलेल्या जे.एन.पी.टी.ला देशामधील सर्वोत्तम बंदरांपैकी एक म्हणून स्थान मिळेल. बंदर आणि द्रोणागिरी परिक्षेत्राला जोडलेले हे हब, एनएच ४ बी महामार्गामधून प्रवेश करीत एसएच ५४ला जोडले जाईल.
सिडकोने बंदराच्या परिसरात असलेल्या द्रोणागिरी परिक्षेत्राला पोर्ट लॉजिस्टीक हब म्हणून विकसित केले. सीएफएस/वेअरहाऊस क्षेत्रातील काही महत्त्वाच्या कंपन्या आणि काही पेट्रोल पंप आणि वजनकाटे येथे स्थापित करण्यात आले. तथापि, या परिसरामध्ये भोजनालये, रात्रीचे आश्रयस्थान, दुरुस्ती गॅरेज, सार्वजनिक शौचालय वगैरे आवश्यक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे यापैकी बऱ्याच महत्वाच्या अत्यावश्यक सेवा या अनौपचारिक क्षेत्रामध्ये अनियोजित पद्धतीने निर्माण झाल्या आहेत.
बंदर व्याप्ती वाढीमुळे वाहनतळ तसेच रहदारीसंबंधी काही गंभीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात हे ध्यानात घेऊन या बंदराच्या प्रभावाखालील परिसरातील क्षेत्रात एक बंदर शहर (पोर्ट सिटी) विकसित करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला.