19/02/2026
ज. जि. म.वि.प्र. सह संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शन नुसार महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते. तसेच प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे. व जेष्ठ प्राध्यापक डॉ.एस. आर. गायकवाड . कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मनोज पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आर. व्ही. निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून शौर्य, धैर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला.
शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभे केले. किल्ल्यांची उभारणी, सक्षम आरमार, शिस्तबद्ध सैन्य, न्यायनिष्ठ प्रशासन, स्त्रियांचा सन्मान आणि धार्मिक सहिष्णुता ही त्यांच्या राज्यकारभाराची विविध वैशिष्ट्ये होती.
अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा. एम .डी खैरनार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची माहिती सांगुन व गडकिल्ले हेच महाराजांची संपत्ती होती असे सांगितले. आदर्श राज्य व्यवस्था महाराजांनी चालवली
संपूर्ण जगभरात आजही शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होतो. युवकासाठी महाराजांचे विचार प्रेरणादायी ठरतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संतोष जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रा.आर. डी. पवार यांनी मानले.
, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी मिलिंद बोरघडे व प्रमोद भोईटे इ. सहकार्य केले.